केशरी रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! खात्यात थेट जमा होणार पैसे, प्रत्येक व्यक्तीला मिळणार इतके रुपये, तुमचा जिल्हा आहे का? इथे पहा 

मुख्य ठळक मुद्दे (Highlights):

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  •   राज्य सरकारचा मोठा निर्णय, 14 जिल्ह्यांतील केसरी रेशन कार्डधारकांना थेट आर्थिक मदत.
  •   अन्नधान्याऐवजी आता मिळणार प्रति व्यक्ती प्रति महिना ₹170.
  •   तुमच्या कुटुंबाला किती पैसे मिळणार? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या.
  •  तुमचा जिल्हा यादीत आहे का? 14 जिल्ह्यांची संपूर्ण लिस्ट येथे पहा.

Ration card Maharashtra subsidy latest news: महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी  समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर तो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.

राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केसरी (APL) रेशन कार्डधारकांना आता अन्नधान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे (Direct Benefit Transfer – DBT) मिळणार आहेत.

या निर्णयासाठी मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झाले असून, तसा जीआर (GR) सुद्धा जारी करण्यात आला आहे. पण तुम्हाला किती पैसे मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेत तुमचा जिल्हा पात्र आहे का? चला, या बातमीचा प्रत्येक पैलू सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया.

काय आहे नेमकी योजना आणि कोण आहेत पात्र?

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत गरिबांना मोफत धान्य मिळते, ते पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. मात्र, राज्य सरकारकडून जे केसरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य मिळायचे, त्याऐवजी आता थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही योजना प्रामुख्याने राज्यातील त्या 14 जिल्ह्यांसाठी आहे, जिथे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यातील APL (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असतील.

प्रत्येकाला किती पैसे मिळणार? ‘असं’ आहे कॅलक्युलेशन!

आता तुमच्या मनात सर्वात पहिला प्रश्न आला असेल की, पैसे नेमके किती मिळणार? सरकारने सुरुवातीला प्रति व्यक्ती ₹150 देण्याचा विचार केला होता, पण आता त्यात वाढ करून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति महिना ₹170 रुपये देण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.

हे गणित अगदी सोपे आहे. समजा, तुमच्या रेशन कार्डवर कुटुंबातील ४ व्यक्तींची नोंद आहे, तर तुम्हाला दरमहा 4 x ₹170 = ₹680 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात सबसिडीच्या (Subsidy) स्वरूपात जमा होतील. कुटुंबात जेवढे सदस्य, तेवढा जास्त फायदा! ही रक्कम तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार ठरू शकते.

हे पण वाचा:लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? मराठवाड्यातील सव्वा लाख बहिणी लाभार्थी यादीतून बाहेर होणार! तुमच तर नाव यादीत नाहीना

तुमचा जिल्हा यादीत आहे का? ‘ही’ आहे 14 जिल्ह्यांची संपूर्ण लीस्ट 

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न – या योजनेत माझा जिल्हा आहे का? खाली दिलेल्या यादीत तुमचा जिल्हा आहे का, हे लगेच तपासा. सरकारने जाहीर केलेले 14 भाग्यवान जिल्हे खालीलप्रमाणे आहेत:

अमरावती विभाग:

  1.  अकोला
  2.  अमरावती
  3.  बुलढाणा
  4.  वाशिम
  5.  यवतमाळ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग:

6. छत्रपती संभाजीनगर

7. बीड

8. धाराशिव (उस्मानाबाद)

9. हिंगोली

10. जालना

11. लातूर

12. नांदेड

13. परभणी

नागपूर विभाग:

14. वर्धा

जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुमच्याकडे केसरी (APL) रेशन कार्ड असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. या निर्णयामुळे या १४ जिल्ह्यांतील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment